Posts

Showing posts from January, 2017

स्वातंत्र्यप्रती असलेले मनातले प्रश्न.

Image
स्वातंत्र्य दिन / प्रजासत्ताक दिन १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वातंत्र्य झाला आणि २६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र झाले; असे लहान पणापासून ऐकले आणि नंतर पुस्तकात वाचले आणि आज तोंडपाठ आहे. कित्येकदा ऐकून, साजरा करून, वाचून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी डोक्यात फीट बसले आहे. मरेपर्यंत विसरणार नाहीच. पण, मला अजून समजलेच नाही “नेमका भारत काय स्वातंत्र्य झाला..?? का झाला..?? कशासाठी झाला..?? आणि कोणापासून झाला..??” “कधी झाला.?? आणि कोणापासून झाला..?? याचे उत्तर आहेत... १५ ऑगस्ट १९४७ आणि इंग्रजापासून.”  हे पण इतिहासाच्या पुस्तकातल्या गोष्टी आणि मोठ्या माणसांच्या गोष्टी/भाषणातून ऐकलेला तेवढाच समजला आणि तसाच स्वातंत्र्याचा अर्थ माहिती आहे. बाकी शून्यच!! लहानपणीचे शाळेचे दिवस.. त्यातील झेंड्याचा दिवस.. रात्री हातावर मेहंदी.. आणि सकाळी लवकर उठून शाळेत जायचं.. झेंडावंदन.. राष्ट्रगीत.. नंतर गावाने निघालेली प्रभातफेरी.  त्यात एखाद्या चौकात गाव पुढार्यांनी दिलेल्या चोकलेट, संत्र्या गोळ्या चघळत दिलेले भारत माता कि जय.. वंदे मातरम.. एक रुपया चांदी का.. इन्कलाब जिंदाब...

ओझं.

Image
ओझ किती सहन कराव लागतं या न दिसणा-या मनाला... कधी, शब्दांच,.. भावनेच,.. नजरेच.!! तर कधी, रंगाच,.. रुपाच,.. स्वभावाच.!! ओझ कोणाच्या रागाच तर कोणाच्या प्रेमाच.. आपुलकीच.!! ओझ मैत्रीच,.. तर कोणाच्...

डोंगरकड्याची ओळख - जटाशंकर!!

Image
डोंगरकड्याची ओळख - श्री. जटाशंकर. जटाशंकर डोंगरकड्यात कधी आले..?? कोणी आणले..?? कसे आले..?? या सारखे बरेच प्रश्न मनात येतात, पण कोणाला विचारतच नाही आपन.. आणि उत्तर मिळत नाही, म्हणून जट...

दंगल.. स्वप्नांची.!!

Image
दंगल गीता, बबीता, आणि महावीर फोगट... ( इच्छा, आकांक्षा आणि स्वप्नांची दंगल.) काय आहे नेमकी स्टोरी, कोणासाठी आहे.?? दंगल म्हणजे मनातल्या मनाची कुस्ती.. ज्या कुस्तीत कधीच आपल्या मनासारख होत नाही.. पन ती कुस्ती खेळायची ती जिंकण्यासाठीच..!!! पडद्यावर दंगल पाहुन बापाची दंगल कळते. आणि प्रश्न पडतात.. का असतात स्वप्न.. काहीच लोकांसाठी.?? का मरतात आणि मारतात आपल्यातल्या त्याला.. काय मिळते..?? किती सोप आहे जीवन, का अवघड करुन घेतात ते लोकं..?? महावीर फोगट तुम्ही खरचं का केल हे सगळ..?? देशासाठी.. लेकीसाठी.. खेळासाठी कि प्रत्येक बापाचा मेसेज लेकरांना सांगण्यासाठी..  कि "एक अपूर्ण स्वप्न ते पूर्ण करण्यासाठी बाप काय काय करतो.??" हे दाखवण्यासाठी. आजच्या काळात आम्हाला जे चांगल दिसते ते पाहिजे असते. पण, का मिळत नाही..  हरतो आम्ही,  लडतो आम्ही, कित्येकदा पडतो.. पुन्हा लढतो. पण कधी जिंकतो..?? हेच कळत नाही.. म्हणून कधी कधी जिवंत पणेच मरतो.!! बाप असतोच सगळ्यांच्याच आयुष्यात, कधी कधी नको वाटतो, जुना होतो.. राग येतो, त्याच्या पद्धति आणि काम पाहुन.  स्वतःचा कि त्याचा तेच क...

निरोप. ओळख २०१६.

Image
निरोप २०१६.!! दिवस येतात, दिवस जातात.. काही दिवस घडतात तर काही घडवतात. सगळ्या दिवसांची गोळा बेरीज करुन जे उरते ते म्हणजे आठवणी, व त्यातल्या त्या बोलक्या गोष्टींची शिदोरी. २०१६ हे वर्ष वैयक्तिक, पारिवारिक, सामाजिक, राजकिय, आर्थिक, व्यावसायिक, शैक्षणिक, शारिरिक, ऐतिहासिक, क्रषी, क्रिडा या सर्वच क्षेत्रात लक्षनिय तर आहेच परंतु बोलके आणि आयुष्यभरासाठी खुप काही शिकवणारे आहे. खडतर, एकलकोंडे, रडवणारे, घडवणारे जीवनाची परीक्षा घेणारे हे वर्ष आहे. आले ते गेले आणि येणार ते जाणार हा निसर्गाचा नियम आहे. काय ठेवायच आणि काय फेकायच, सोडायचं हे आपल्यावर आहे.

जीवन गाणे. गातच राहणे.

Image
वाट पाहायची, पण शांत रहायचं, क्षण येतील जातील, पण त्या आठवणी राहतील. त्या बोलतील मनाला, तेव्हा हेच शब्द सांगतील  जीवन आहे हे.. त्यात हसायच-रडायच, दिवसातून एकदा बेलगाम उडायच मनसोक्त खेळायच आणि मस्त जगायच, आलेल्या प्रसंगात मिसळत, तो जिंकायचा. मोठ्या आवाजात ओरडून सांगायच , जीवन आहे हे... बिनधास्त जोरात डि जे लावून, मोकळे नाचायचे, कधी एकट्याने मनाला बोलणारे गाणे वाजवायचे, हळूच आपल्यातल्या आपल्याला बोलायचं आणि सांगायचे, जीवन आहे हे.... असच कधी काही आवडले तर पेन घ्यायची आणि त्याला शब्दात कायमच बंद करुन जपायच. आणि त्याला नाव द्यायच, जीवन आहे हे.!! त्याच स्वागत करायच आणि सतत पुढेच चालायच.।।