Posts

Showing posts from February, 2017

शिवजयंती - २०१९.

Image
 "शिवजयंती आणि परमनंट चे विचार." शिवबा, शिवाजी, शिवराय, शिवाजी महाराज, राजे, छत्रपति, जाणता राजा अशी कितीतरी नावे एका मानवाने एका आयुष्यात कमावलीत.  शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे.?? कदाचित शेक्सपियर यांनी "शिवाजी" या नावाचा अभ्यास केला नसावा, म्हणून तो प्रश्न त्यांना असेल.  भारतात, महाराष्ट्रात आल्यानंतर कळतं कि, "शिवाजी" या नावाचे "चलन" काय आहे.??  काय काय कारनामे ह्या नावाच्या साहाय्याने होऊ शकतात हे कळते. तसे शिवाजी महाराजांचे आपल्याला माहिती असलेले कार्ये खुप मोठे आहेत. ३५० वर्षापासून आपण फक्त मोजक्याच कामाचा उदो उदो करतो आणि महात्म्य गातो, मोजकेच पराक्रम गात बसतो. शिवाजी महाराजांचा एक फतवा (कायदा/आदेश) होता..  "सर्वांस पोटास लावणे आहे. " हे तसे चार शब्द पण अर्थ आणि काम अजूनही चालूच आहे.  ययातून शिवाजी महाराज आणि त्यांचा राज्यकारभार, काळजी, जिम्मेदारी हे सर्व दृष्टीकोन आपल्या लक्षात येतात.  त्या कायद्यातून शिवरायांना अभिप्रेत होते,.. "सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, काम, सुरक्षा आणि शांति." हा कायदा...

न संपनारी गोष्ट...

Image
ती काल आली होती, मी गेलो होतो. सांगायचं होत मी पण आलो आहे. पण, बोलायचं नव्हते. यात हरकत नाही, दिसण्याची.. हसण्याची, बघण्याची आणि जगण्याची बरकत आहे. म्हणून बोलो नाही, पण सांगितलच, कि.. "बंद केलेल्या त्या मनात, आठवणींच्या सावलीत, आशेचा किरण पुन्हा पुन्हा येतोच. आणि चमकतोच अंधारलेल्या मनाच्या कोठडीत. एकदम लख्ख दिसतो. अडगळीत बंद करुन ठेवलेल्या मनाच्या भिंतीवर.. तो आशेचा किरण पुन्हा दार उघडून वाट करायला सांगत असतो. पण,  हे नंतर समजत.. लख्ख प्रकाशमय खोली पेक्षा अंधारलेल्या खोलीत प्रकाशकिरणांच तेज आणि सौंदर्य जास्त आकर्षक, प्रफुल्लित, प्रसन्न असते. देवाच्या अंधकारमय देव्हा-यात सुर्यकिरणांचा अभिषेक मन स्थिर आणि शांत करते. अखंड सुर्यप्रकाशापेक्षा जास्त सुर्यकिरण प्रत्येकाला हवेशे वाटतात. उन्हात असलेल्या मनाला, सावली रुपी विसावा हवा असतो. अंधारात आणि बंद केलेल्या खोलीला किरण हवा असतो. तिथेच अंधारलेल्या खोलीत, शांत एकांत ठिकाणी अंधार आणि प्रकाशाच मिलन होते. मन आणि डोके जाग्यावर येते. बोलने होते... डोळ्यातून.!!" हा मेसेज माझ्या मनाने डोळ्यातून, फॉरवर्ड केला. चे...